प्रत्येकाच्या मनात किती तरी असे विचार असतात जे आपल्या मनात सतत धुमसत असतात काही नुसतेच रुंजी घालतात तर काही नुसतेच हेलकावे खात रहातात … खरं तर ते आपल्या मनात भूंग्या सारखे सतत भुन भुन करत असतात…! जे आपल्याला अस्वस्थ करतात …. तीच अस्वस्थता इथे कवितांच्या रुपात मांडण्याचा प्रयत्न … !!!!
गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०१५
कल्पवृक्षाची मुळे .... !!
आईच्या गर्भात असतांना
तिच्या अतृप्त इच्छा
आणि मग, आपली गळणारी
अतृप्त वासनांची लाळ
वहातच राहते
आयुष्यभर ....!
कधी येईल तृप्ततेचा ढेकर …?
जेंव्हा आम्ही रुजवू
आमच्या अंतर्गर्भात
सर्वव्यापी … सर्वदूर
कल्पवृक्षाची मुळे .... !!
Samidhaji aapali kalpwrukshachi kavita khup aawdali
उत्तर द्याहटवा